Summary of the Book
अस्सल ग्रामीण बाजाच्या कथा असणारा हा संग्रह त्याच्या नावापासूनच लक्ष वेधून घेतो. दि. बा. पाटील यांचे साहित्य ग्रामीण भागाशी निगडित असते. त्यांच्या लेखनात असलेला निर्भीडपणा व त्यांच्या पात्रांचा सत्याला जाऊन भिडणारा स्वभाव यामुळे त्या कथा वेगळ्या ठरतात. खेड्यातील वातावरण चपखलपणे मांडत शेतकर्यांची दु-खे नेमकेपणाने मांडत, राजकारणावरही ते कठोरपणे प्रहार करतात. सूक्ष्म निरीक्षण आणि रांगडी भाषा यांतून गावाचे वातावरण ते चपखलपणे उभे करतातच, शिवाय यातील व्यक्तीही ठसठशीतपणे उभ्या करतात.