Summary of the Book
'डॉ. विश्वास मेहेंदळे' यांच्या या आत्मवृत्ताचे प्रयोजन आपल्याला आलेल्या विविध अनुभवांचे भांडार खुले करणे एवढेच आहे. त्यांच्या प्रगतीच्या आड येणा-या कुणा व्यक्तीबद्दल आकस वा द्वेष मुलक असे काही त्यांनी लिहिलेले नाही. 'आलीया भोगासी' आपण कसे 'सादर' होत गेलो हे त्यांनी निकोप वृत्तीतून सांगितले आहे. खळखळणारा प्रवाह ओलांडून, त्यातील भोव-यातुन स्वतःला वाचवीत नदी पार केल्यावर, आता काठावर बसून ते वाचकांशी शिळोप्याच्या गप्पा करीत आहेत. आशा गप्पागोष्टींचे हे पुस्तक आहे.