Summary of the Book
सनातन अशा भारतीय संस्कृतीने भारतीयांना वेद, उपनिषदे इत्यादी ग्रंथांच्या रुपाने अतिशय मौलिक विचारबीजे पुरविली आहेत. या बीजरूप वैचारिक ग्रंथांच्या सहाय्याने अनेक विचारशाखा निर्माण झाल्या. भगवद्गीता, भागवत, शाण्डिल्यांची भक्तीसूत्रे, नारदांची भक्तीसूत्रे यासारख्या ग्रंथांनी भक्तीचे रसायन प्रभावी केले आणि संस्कृतीवृक्षाला भगवदभक्तीची सुमधुर फळे आली. या भक्तीच्या फळांना गोडी आणणार्या नारदांच्या भक्तीसूत्ररूप रसायनाचा सर्वांगपरिपूर्ण परीचय करून देणारं हा ग्रंथ!