Summary of the Book
संस्काररुपी रथचक्रात स्त्री आणि पुरुष अशी जरी दोन चाके असली तरी मध्यंतरीच्या काळात स्त्रीच्या वाट्याला दुय्यम भूमिका आली होती.मध्यंतरीचा काळ असे मी म्हणतो कारण पूर्वी स्त्रियांना सतीसावित्री आणि देवीचा मान मिळालेला होता. आजकाल प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांची कामगिरी चूल आणि मुलपुरती न उरता विविध क्षेत्रात त्यांची भरारी चालू आहे.
या पुस्तकातील पाचही दीर्घकथा स्त्रीच्या गौरवगाथा असे मानायला हरकत नाही. त्या दृष्टीने महाराष्ट्राचे श्रेष्ठ कवी श्रीयुत नारायण सुर्वे यांच्या चार ओळी:
'उगीचच चीरवेदनेच्या नादी लागू नकोस
तुला आवडेल असे एक नवे घर कर
मला स्मरून कर
हवे तर मला विस्मरून कर.'
तसेच आणखी एका अनामिक कवीची प्रत्ययकारी अभिव्यक्ती:
'नाही मोडणार डाव, जिंकण्यास करेन धावाधाव
ठेवून वेदना उराशी, नको व्यर्थ अश्रूंचा लपंडाव
सत्य असत्याच्या खेळात काय मिळवले आणि घालवले
हिशोब ठेवू कशाला पराभवाचा, जिंकेन सारे डाव'
आणि
महान गोमंतकीय कविवर्य बा भ बोरकर म्हणतात,
'दिव्यत्वाची जेथे प्रतीती, तेथे कर माझे जुळती.'