Summary of the Book
'मला हो म्हणतात लवंगी मिरची,' 'कसं काय पाटील बरं हाय का' किंवा 'सोळाव वरीस धोक्याचं' या लावण्या अजरामर करणाऱ्या सुलोचना चव्हाण यांचे हे आत्मचरित्र आहे. सविता दामले यांनी या आत्मचरित्राचे शब्दांकन केले आहे. त्यांनी वयाच्या चौथ्या पाचव्या वर्षापासूनच गायला सुरुवात केली होती. सुलोचनाबाईंच्या बालपणापासूनच्या आठवणींनी त्यांच्या कहाणीची सुरुवात होते.
शालेय जीवन, स्टुडीओच्या चकरा, अभिनय, गाण्याचे वेड, जीवनसाथी, विवाहानंतरचे आयुष्य, लावणी, हिंदी गाणी, लोकप्रियता, वाहवा अशा टप्प्यांमधिल प्रवास पुस्तकामधून समोर येतो. त्याचबरोबर तो काळही समोर उलगडतो. त्यांनी गायलेल्या हिंदी आणि मराठी गाण्यांची यादी, चित्रपटाचे नाव, संगीतकारासह अखेरीस दिली आहे.