Summary of the Book
ही मराठवाडी बोलीभाषेतली ग्रामीण कादंबरी आहे. तिचा विषय तसा साधा आहे. बजरंग हा या कादंबरीचा नायक तसा सामान्य कुटुंबातला. आई गिरिजा आणि पत्नी सखू यांच्यासह त्याचं जगणं कसंबसं चालू असतं. पण पत्ते खेळण्याच्या त्याच्या व्यसनाने घरात कशी अशांतता नांदू लागते, त्याचं चित्रण यात लेखकाने केलं आहे. शेवट तसा सरधोपट म्हणजे अखेर सगळं गोडं झालं अशा प्रकारचा आहे. पण या कादंबरीची भाषा आणि शैली मात्र साधी, सोपी आणि संवादी असल्याने त्यात काही प्रमाणात नजाकत आली आहे.