Summary of the Book
भारतात आणि एकूण जगात धर्म प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व अर्थव्यवस्थाही धर्माने नियंत्रित केलेली असे. आजही अवस्था थोड्याफार प्रमाणात तशीच आहे. भारतात धर्म व जातीपातीची मुळे खोल रुजली असल्याने विषमता वाढली आहे. नवीन अर्थव्यवस्थेने यात बदल होऊन काही सिद्धांत नाहीसे झाले आहेत. तरी हक्क, अधिकार, अर्थकारण या भोवती पुन्हा धर्म, जात येत राहतात. विषमतेचा अंत कसा होईल, हतबलता निर्माण करणारा धर्म नाहीसा करता येईल का, या प्रश्नांचा उहापोह मिलिंद कीर्ती यांनी नव्यान विषमता अंताचा लढा मधून केला आहे. यात गुलामगिरी व अस्पृश्यता, भारतातील व जगातील दलित, जाती, जमाती, अमेरिकेतील वर्णवाद, वंशवादाविरूध्दचा लढा, राजकीय, सामाजिक स्वातंत्र्य, भारतातील जाती आणी राजकारण, डॉ. आंबेडकर यांना अपेक्षित आदर्शवाद व्यवहारात आणण्यासाठी काय केले पाहिजे याचीही चर्चा केली आहे.