Hard Copy Price:
25% OFF R 250R 187
/ $
2.40
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
" माझ्या लहानश्या कंपनीस या लाटेमधून सहीसलामत बाहेर काढण्यासाठी मला भोवतालच्या पराकोटीच्या शक्यतांच भान राखण गरजेचं होत. एकंचुकीची कृती अथवा चुकीचे धोरण माझी कंपनी उध्वस्त करेल हा धोका होता. १९९५ साली जेव्हा 'डॉट कॉम' ची लाट जगभरात पसरली आणि सगळं जगच त्या लाटेचा एकभाग बनलं होत; तेव्हा अजित बालकृष्णन तंत्रज्ञानाच्या नवीन आणि अद्भुत क्षेत्रात शांतपणे नवीन प्रयोग करूपहात होते. त्यांची कंपनी न्यूयॉर्कच्या नॅसडॅकमध्ये 'पब्लिक' व्हावी म्हणून मोठमोठे गुंतवणूकदार, बँकर्स आणि नावाजलेले वकील त्याच्या मुंबईच्या लहानश्या ऑफिसमध्ये हेका धरून बसले होते. बाळकृष्णन यम्मी आपला मार्ग निवडाला आणि या वाटेवर स्वार होत आपल्या कंपनीला लंडन, हँबर्ग, बॉस्टन, सॅन फ्रान्सिस्को आणि न्यूयॉर्कच्या बलाढ्य आर्थिक शहरांमध्ये उत्तम स्थान मिळवून दिल. या सर्व प्रवासात बालकृष्णन यांनी सर्व संकटांवर धडाडीने मात केली. लोअर मॅनहॅटनच्या न्यायालयात एका बड्या वकिलांनी फसवणुकीच्या दाव्याखाली बालकृष्णन यांच्याकडून जबर खंडणी उकळायचा प्रयत्न केला. काही इन्व्हेस्टमेंट बॅंकर्सनी त्यांची कंपनी गिळंकृत करायचाही प्रयत्न केला, परंतु हि सारी कट-कारस्थाने यांनी यशस्वीरीत्या उधळून लावली आणि व्यवसाय व तंत्रज्ञानाच्या अत्यंत अस्थिर क्षेत्रातही जगाला काहीतरी अर्थपूर्ण योगदान देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी २००० आणि २००८ च्या मंदीतून आपल्या कंपनीला अक्षरशः खेचून बाहेर काढले. अमेरिकेतील वर्ड ट्रेंड सेंटरवरच्या अतिरेकी हल्ल्यात इमारती जमीनदोस्त होताना त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पहिल्या. एकीकडे ओएल आणि नेटस्केप या एकेकाळच्या बलाढ्य कंपन्या धुळीला मिळताना बघून बालकृष्णन अचंबित झाले; तर दुसरीकडे फेसबुक आणि गुगलच्या गरुडभरारीचेही ते साक्षीदार झाले. भारताच्या न्यायव्यवस्थेशीसुद्धा त्यांना लढा द्यावा लागला आणि 'रिडीफ' या त्यांच्या कंपनीचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावले. बालकृष्णन यांच्या मते, ज्या संघर्षाचे ते भाग होते, तो केवळ साधा व्यावसायिक संघर्ष नसून भविष्यातील माहिती युगाची ती सोनेरी पहाट होती.