Summary of the Book
भारतीय राज्य घटना तयार करताना अल्पसंख्यांक समाज कोणते, याची सूची तयार करून त्यांच्यासाठी विधानमंडळात जागा राखीव ठेवल्या . दहा वर्षानंतर त्या रद्द करण्यात याव्यात, अशी अपेक्षाही होती. मात्र आज स्वातंत्र्याची साठी उलठली तरी याबाबत निर्णय घेण्यात आला नाही. अजही आरक्षणाच्या मुद्यावरून चर्चा घडतात, संघर्ष होतात. आरक्षणाचा निर्णय योग्य की अयोग्य, त्याचे यशापयश, याचा मागोवा 'य. दि. फडके' यांनी 'खरी ही न्यायाची रीती' या पुस्तकात घेतला आहे. अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक, राखीव जागा म्हणजे नेमके काय, तसेच डॉ. आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज यांनी सामाजिक न्यायासाठी केलेले कार्य, याची माहिती मिळते.