Summary of the Book
संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. चंद्रकांत धांडे यांनी या पुस्तकात राज्यातील विविध संतांवर लेखन केलं आहे. धांडे यांनी वेळोवेळी संतांच्या तत्त्वज्ञानावर विविध ठिकाणी व्याख्यानं दिली आहेत. या पुस्तकात त्यांनी संत ज्ञानेश्वरांवर पाच लेख, तर संत एकनाथ, संत नामदेव आणि तुकाराम, संत सोपानदेव आणि संत रामदास यांच्यावर लेखन केलं आहे. 25 लेखांतून त्यांनी संतपरंपरा आणि संतांचं सामाजिक योगदान, त्यांची शिकवण यावर भर दिला आहे. साईबाबा आणि शेख महंमद यांच्या कार्यावरही त्यांनी लिहिलं आहे.