Hard Copy Price:
15% OFF R 100R 85
/ $
1.09
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Preview
Summary of the Book
बदलत्या भारताची वेगाने वाढणारी ऊर्जेची गरज अणुशक्तीच पुरी करू शकेल, असा दृढ विश्वास असणारा हा शास्त्रज्ञ. डॉ. काकोडकर हे भारताच्या अणु-कार्यक्रमाचे आघाडीचे शिलेदार. ते भारताच्या अणुशक्ती आयोगाचे दहा वर्षांहून अधिक काळ अध्यक्ष होते.
कागदोपत्री निवृत्त वाटणारे काकोडकर अजूनही दिवसातील बारा तास अणुकोशात राहून भारताच्या अणुऊर्जा विषयक समस्यांची उकल करण्यात मग्न असतात.
मध्यप्रदेशातील बडवाणी येथे त्यांचा जन्म झाला. तेथे शालान्त परीक्षा देऊन ते मुंबई "व्हीजेटीआय'मध्ये रूजू झाले आणि 1963 मध्ये बी.ई झाले. त्यावेळी ते जेमतेम 20 वर्षांचे होते. नंतर त्यांना भाभा अणुशक्ती संशोधन केंद्रामध्ये नोकरी मिळाली. गुण, कष्ट आणि कौशल्याच्या जोरावर त्यांची निवड इंग्लंडमध्ये उच्च शिक्षणासाठी झाली. "एक्सप्रिमेंटल स्ट्रेस ऍनॅलिसिस' सारखा विषय निवडून त्यांनी नॉटिंगहॅम विद्यापीठातून "मास्टर्स' पदवी मिळवली.
भारतात परतल्यावर त्यांनी "ध्रुव' या अणुभट्टीचे डिझाईन-उभारणी आणि नंतर दुरूस्ती पण केली. पोखारण येथील 1974 आणि 1998 मध्ये भारताने जी अणुचाचणी केली, त्यात त्यांचा सहभाग होता. अणुऊर्जेप्रमाणेच त्यांनी जैवऊर्जा, जैवइंधन यासाठीची सयंत्रे, पायलट प्लॅंटस बनवून त्यांचा प्रत्यक्ष उपयोग करून पाहिला. त्यामुळे ऊर्जाही मिळाली आणि प्रदूषणालाही आळा बसला. अभ्यास कल्पकता, कष्ट नवनिर्मितीची आस आणि कुशलतेचे भरभक्कम अधिष्ठान लाभल्यामुळे काकोडकरांना नवभारत घडविण्यासाठी ऊर्जा मिळत गेली आहे.
भावीकाळात केवळ अणुऊर्जा भारतालाच नव्हे, तर जगाला तारून नेणार आहे. तथापि या बाबतील लोकांच्या मनात भय-शंका व अनभिज्ञता आहे. डॉ. अनिल काकोडकर यांनी हे जाणले, आता संयमितपणे या संदर्भातील लोकसंभ्रम ते दूर करत आहेत. गेली पाच दशके अहर्निश झपाटून काम करणाऱ्या या शास्त्रज्ञाचे आवर्जून वाचलेच पाहिजे, असे चरित्र.