Hard Copy Price:
25% OFF R 400R 300
/ $
3.85
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
'माझी भूमी', 'माझा देश', 'माझा लढा' ,या भूमिकेतून काश्मीरमधला आतंकवाद निर्माण झालेला नसून ,पाकिस्तानी हव्यासांच्या परिपूर्तीसाठी आय. एस. आय. ने निर्माण केलेले हे मायाजाल आहे . पाकिस्तान व इस्लामी देशांकडून येणाऱ्या भरमसाट निधींमूळे भवितव्याची चिंता मिटलेल्या उग्रवादी संघटकांच्या उपजीविकेचे साधन म्हणजे काश्मीरचा लढा ठरले आहे . काश्मीरमधील वातावरण तापते व जनजीवन अस्थिर ठेवण्यासाठी पाकिस्तान रगगड् पैसा ओतत होता. त्यामुळे काश्मीरमधील अगदी कोवळ्या वयातील मुलांना कट्टर धर्मवादाचे शिक्षण व आतंकी कारवायांचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या हातात अत्याधुनिक बनावटीच्या अत्यंत भयंकर शस्त्र ठरलेल्या 'कलाशिनकोव्ह' रायफली देताना आय. एस. आय. च्या दलाल ठरलेल्या उग्रवादी संघटकांच्या काळजाला बरे पडत नव्हते . कोवळ्या मुलांच्या मनात हिंदू धर्म व भारतवदेशाचे विष कालवून त्यांना जिहादच्या मार्गावर आत्मघातसाठी प्रवृत्त केले जात होते. मुल्लामौलवींच्या नेतृत्वासाठी चालविल्या जाणाऱ्या आतंकी प्रशिक्षणाच्या कारखान्यांतून भारत व हिंदू धर्माविषयी परकोटींची वदेश ,घृणा व तिरस्कार घेऊन मुख्य प्रवाहात येणारे हे तरुण स्वतच्याच भूमीसाठी आत्मघाती ठरले आहेत.
काश्मिर समस्या माहीत होते पण काय व कशी सूरू झाली ते स्पष्ठ पणे माहीति नव्हते.लेखिकेने खूप स्पष्ठ शब्दात मूळापासून ते आत्तापर्यंत विस्त्रूतपणे सांगितले आहे.आपला अभ्यास,मेहनत आणि स्मरणशक्ती दांडगी आहे.विषयाची मांडणी व्यवस्तीत आहे.मूख्य म्हणजे हे पूस्तक कूठेच,काहीवेळा घटनांची पूनरार्वूत्ति असूनसूध्घा अजिबात कंटाळवाण वा रटाळ होत नाही.काश्मिर समस्याची पूर्ण ओळख होते.काश्मिर विषय आपल्या राजकारण्यानि एव्हढा क्लिष्ट व आतंराष्टिय केलेला आहे की त्याचे समाधान कधी होईल असे वाटत नाही.तरी लेखिकेचा अभ्यास बघून मला असे वाटते की तिच्या अनूशंगाने ह्याचे समाधान सांगितले तर बरे झाले असते.तरी सूध्धा हे पूस्तक खूप उच्च लेवलचे आहे आणि प्रत्यकाने अवश्य वाचावे अशी अपेक्क्षा करतो.लेखिकेचे मनापासून अभिनंदन व आभार.