Summary of the Book
प्रेम ! अवघ्या अडीच अक्षरांवरती सगळं जग कसं जीव टाकतं ! पण असतं कस ते.... बसतं कसं ! हळूच कोणावर जडत कसं ? तारुण्याच्या नव्हाळीत पडणारे कितीतरी प्रश्न.... आपण 'लकी ' आहोत की ' अनलकी ' हे ही उमेशला उमजत नव्हतं. कसं अगदी अवचित, अलगद त्याच्या ओंजळीत यायचं , जगणं अवघं बहरून जायचं .... पण बघता बघता ते निसटूनही जायचं का असं व्हावं ?
उमलणाऱ्या प्रेमालासुद्धा कोमेजण्याचा शाप असतो का? प्रेमालाही विळखा का 'पुढे काय' प्रश्नाचा ! आर्त, व्याकुळ उमेशचं मन मग शोध घेत राहायचं प्रेमाचा.... स्वतःचा .... आयुष्याचा !