Summary of the Book
तथागत गौतम बुद्ध , संत कबीर आणि महात्मा फुले यांच्या विचारांचा मागोवा प्रा. किसन गाडेकर यांनी 'बुद्ध , कबीर , फुले तत्त्वज्ञान व भारतीय समाज' या पुस्तकात घेतलेला आहे .
मानवी जीवनात सामाजिक , आर्थिक , राजकीय , शैक्षणिक व सांस्कृतिक रचना ही समता , स्वातंत्र्य , बंधुत्व आणि न्यायाच्या मानवी जीवन मुल्यांवर आधारित असावी ; यासाठी मानवी जीवनाच्या उत्थापनासाठी स्वतः प्रयत्नवादी पाऊले उचलून तत्कालीन व्यवस्था जी विषमतावादी होती , वेद , पुराणे , पोथी , देव , दैव या वादात अडकून पडलेली ही सर्वांगीण व्यवस्था बुद्ध , कबीर , फुले यांना नको होती . त्यांना माणसाच्या मनाचा विचार करणारी व्यवस्था हवी होती . या विचारामधून लेखकाने आपल्या लेखनाचे प्रयोजन सूचित केले आहे .