Summary of the Book
किशोर ते कुमारवयीन वयाच्या टप्प्यातील मुलांचं भावविश्व जाणून घेण्याचा प्रयत्न 'कळी उमलताना' मधील लेखांमधून केला आहे. अनुराधा गोरे यांनी शाळेत अध्यापन करताना, विद्यार्थ्यांच्या रूपातील मुलांच्या अंतरंगाचा वेध घेतला.
घडण्या - बिघडण्याच्या या वयात मुलांना आश्वासक शब्दांनी, मायेनं धीर देऊन इष्ट मार्गाकडे वाळवणं आवश्यक असतं. त्यासाठी मुलांमध्ये विश्वास, आदर, माया, निष्ठा, सहकार्याची भावना, माणुसकी इत्यादी गुणांचा परिपोष व्हावा म्हणून त्यांनी काही यशस्वी प्रयोगही केले.
मुलांमधील उर्जा हळुवारपणे जागृत करून, त्यांना सकारात्मक दृष्टिकोन देणारं हे लेखन पालक- शिक्षकांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल.