Summary of the Book
बोलणाऱ्या प्रत्येकाला केवळ तोंडच महत्वाचे असते असे नाही .कानाची भूमिका बोलताना फार महत्वाची असते.माणूस कानांनी जे ऐकतो तेच पहिल्यांदा शिकतो; नंतर तेच तो आपल्या बोलण्यावाटे व्यक्त करतो.असे असताना ज्या मुलाला ऐकूच येत नाही, त्याची अवस्था काय होत असेल ?हाच प्रश्न निरंजनची आई दीपा आणि वडील रवींद्र भट्ट यांच्या समोर उभा राहिला .पण या अवघड प्रश्नामुळे डगमगून न जाता या जोडप्याने अथक परिश्रम घेतले. आणि जन्मतः कर्णबधिर असलेल्या मुलाच्या कानात,मेंदूत शब्दांचा प्रचंड भरणा केला.आणि त्यांचा तोंडून बोलायला लावले; हा त्यांचा प्रयत्न-प्रवास मनाला थक्क करणारा आहे .मुलाच्या मनात भाषेबरोबर भावनांची बीजेही पेरण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न नवीन आहेत. आज हाच निरंजन उत्तम वक्ता म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय नाट्योत्सवात भाग घेऊन त्याने वाहवा मिळविली.हे यश जे त्याला मिळाले,त्यात त्याच्या आई-वडिलांचा सिंहाचा वाटा आहे .त्यांनी चोखाळलेल्या मार्ग,केलेले उपाय ,अनुभवलेल्या यातना आणि थक्क करणारे अनुभव या सगळ्यांमुळे आज त्या अनुभवांना पुस्तकरूप प्राप्त झाले आहे.