Summary of the Book
कुलदैवत - कुलाचार - कुलपुरुष
वैज्ञानिक शोधामुळे जग दिवसेंदिवस अश्रद्ध, बुद्धीवादी, पुरोगामी बनत चालले आहे. प्रत्येक गोष्ट कार्यकारणभावाच्या निकषावर घासून घेण्याची वृत्ती नव्या पिढीची होत चालली आहे. अनिश्चित जीवनामुळे आम्हा भारतीयांची ईश्वरावरची श्रद्धा अधिक दृढ होत चालली. आमचा देवसंभार, आमचे कुलधर्म - कुलाचार आणि आमच्या समाजात निर्माण झालेले सत्पुरुषांचे आदर्श जीवन यातून मराठी माणूस घडत राहिला आहे. रुढी - परंपरा - कुलाचार पाळताना केवळ आमच्या वाडवडिलांनी असे केले म्हणून आम्हीं करीत आहोत, असें चालू जमाना म्हणत नाही. त्यांना प्रत्येक साजरा होणाऱ्या सणामागाचा इतिहास हवा असतो. कर्मकांडामागचे धर्मशास्त्र हवे असते. परंपरा स्वीकाराण्यामागाचा हेतू जाणून घ्यायचा असतो.
आमचे सणवार, धार्मिक सांस्कृतिक उत्सव, जयंत्या, पुण्यतिथ्या, यात्रा, जत्रा यांमागे काही हेतू आहे, परंपरा आहे. ती शोधून सर्वसामान्य लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न लेखकद्वयांनी या कुलदैवत - कुलाचार - कुलपुरुष पुस्तकात केला आहे. प्रत्येक देवता, सन आणि सत्पुरुष यांच्या विषयी लिहिताना सर्वांगपरिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे. जो पुढच्या काळाच्या दृष्टीने, समाज अधिक जिज्ञासू होत चालला आहे अशा वेळी उपयुक्त आहे.
या ग्रंथाच्या लेखकांपैकी श्री. वा. ल. मुंजळ हे उच्चविद्याविभूषित, भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेत प्रदीर्घ काल संशोधक म्हणून गाजलेले आणि मराठी भाषेचे एक जाणकार लेखक आहेत. गेली तीस वर्षे सातत्याने मराठी वृत्तपत्रे, मासिके यामधून ते लेखन करीत आहेत.
ग्रंथाचे दुसरे लेखक श्री. प्र. रा. अहिरराव हे पुण्यातील एक इतिहास अभ्यासक आणि पत्रकाल म्हणून परिचित आहत. नवनवीन विषयांचे संशोधन आणि लोकप्रिय पद्धतीतून त्यावर लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
या दोन्ही लेखकांचे मनःपूर्वक अभिनंदन.