मी कोण? या प्रश्नापासून कादंबरीला सुरुवात होते. खरंच आपण हा प्रश्न आपल्याला कधीच विचारत नाही. किंवा या बेफाम पणे चाललेल्या स्पर्धेत हा प्रश्न विचारायला वेळच मिळत नाही. आणि मग आपल्या आयुष्याच्या बरबादीला सुरुवात होते. आपण या सिस्टम चे एक सदस्य होतो. सिस्टम जे सांगेल ते आपण करत राहतो. कारण त्या सिस्टम मध्ये मंत्री, अधिकारी, शिक्षक, पालक, नातेवाईक, शिवाय अजून आपल्याला माहीत असेलेले माहित नसलेले कोणतेही लोक असतात. ते आपल्याला वापरून घेतात. त्या सिस्टम प्रमाणे शिक्षण घ्यायला लावतात. तुमची इच्छा असो वा नसो. तुम्हाला तेच करावं लागतं. मग तुम्ही ते करता. कसं बसं शिकता. काहीजण बळच शिकतात. काहीजण आनंदाने शिकतात. काहीजण शिकता शिकता आपली जीवनयात्रा संपवतात. आणि मग शेवटी व काहीजण *नापास* होतात. आणि मग सगळंच बदलून जातं. तुम्ही नापास झाले म्हणजे. तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अचानक बदलून जातो. तुम्ही परीक्षेत नापास झाले म्हणजे, तुम्हाला काहीच येत नाही हे समाज लगेच ठरवून टाकतो. नातेवाईक, आईवडील, शेजारी तुम्हाला कोणीच भाव देत नाही. कारण तुम्ही नापास असता. तुम्ही जोवर पास होत नाही, तोपर्यंत तुम्हाला हा नापासाचा शिक्का मिरवत ल
८०च्या दशकात एका प्रचंड शैक्षणिक स्पर्धेच्या विश्वात जन्माला आलेल्या इंटरनेटचा स्फोट होण्याअगोदरची एक पिढी आहे. त्या पिढीतल्या रूढार्थाने अपयशी ठरलेल्या मुलांची ही गोष्ट. परीक्षेत नापास होणारे विद्यार्थी आयुष्यात नालायक ठरतात, त्यांच्या एकूणच अस्तित्वाची किंमत कमी होते आणि प्रत्येक बाबतीत त्यांचं अपयश त्यांना दाखवून दिलं जातं, ही वस्तुस्थिती या कादंबरीत पुरेपूर उतरली आहे. लातूर शहरातली पार्श्वभूमी आणि त्यानुसार यातल्या मुख्य पात्राची भाषा कादंबरीला स्वतःचं असं शरीर देते. विशेषतः विद्यार्थ्यांनी आवर्जून वाचावी अशी कादंबरी!