Summary of the Book
केशव सखाराम देशमुख यांच्या 'गाभा' काव्यसंग्रहामधील कविता इथल्या शोषण परंपरेविषयी बोलते. विशेषतः जागतिकीकरणोत्तर काळात जी एक प्रकारची सार्वत्रिक विघटनाची प्रक्रिया सुरु झाली, ज्यामुळे श्रमिक आणि कष्टकऱ्यांचे भावविश्व झाकोळून गेले. अशा उध्वस्त आणि अर्थशून्य आयुष्याला ही कविता उजागर करते. आधुनिकीकरणामुळे मूळ चेहरा हरवलेला माणूस आणि शेती हा या काव्यसंग्रहाचा केंद्रवर्ती 'गाभा' आहे.
शतकानुशतके जो समूह इथल्या माती आणि संस्कृतीशी एकरूप झालेला आहे, परंतु त्याच्या आयुष्यातील दाहक वास्तवता जराही कमी झालेली नाही. अशा कुणबी कुळाचा प्रतिनिधी असलेल्या केशव सखाराम देशमुख यांचा हा काव्यसंग्रह ग्रामजीवनांतील विविध स्ठीत्यंतरांचा समर्थपणे वेध घेणारा आहे.