Summary of the Book
महाराष्ट्रात अनेक धर्म, पंथ पुर्वापार कालापासून एकत्र राहात आहेत. त्यांना दिशा देण्याचे कार्य संत करीत आले आहेत. अगदी बाराव्या शतकापासून ते आजच्या एकविसाव्या शतकातही ही परंपरा सुरु आहे. धर्मात सांगितलेली शिकवण, आचरण, तत्वज्ञान सामान्यांपर्यंत त्यांना समजेल अशा पद्धतीने संत-महात्मे पोचवितात. त्यामुळे धर्म-पंथ अनेक असले, तरी त्यातून मिळणारा विश्वशांतीचा संदेश एकच आहे. तो देणाऱ्या संतांची महती डॉ. यू.म. पठाण यांनी 'महाराष्ट्राची संतपरंपरा'मधून सांगितली आहे. यात जैन, शैव, महानुभाव, नाथ आदी विविध धर्म, पंथातील; तसेच जातींमधील संतांची ओळख करून दिली आहे. संतांच्या या परंपरेतून धर्मांची एकत्र नांदणारी संस्कृती, राज्यकर्त्यांचा काल, सामाजिक व्यवस्था समजते.