Summary of the Book
शहरातल्या नागर संस्कृतीपेक्षा मला खेड्यातली नांगर संस्कृती अधिक जवळची वाटते. कारण शेतकऱ्याने आपल्या कृषीधर्माला कुळधर्मासारखेच पवित्र मानले आहे. पिकले नाही किंवा विकले नाही म्हणून त्याने शेती करणे कधी सोडले नाही. तो लाख जिवांचा पोशिंदा आहे, या भावनेशी तो आजवर प्रांजळ राहिला आहे.
आजच्या पिढीला आणि उद्याच्या पिढीला खेड्यातली पूर्वीची पारंपारिक शेती, शेतकऱ्यांचे कष्टमय जीवन, तेथील बोलीभाषा, खेड्यातली चालरीत इत्यादीची वास्तव ओळख या माझ्या 'माती बुक्का' या कविता संग्रहातील कवितांमधून नक्कीच होईल. या कविता जुन्या आठवणीत गुंतवून आणि गुंगवून ठेवतील इतकेच नव्हेतर आधीच्या पिढीकडे अपूर्वाईने पहावयास लावतील असा मला विश्वास वाटतो. !