Summary of the Book
ना.घं.ची कविता साधी आणि सहज आहे. तिचा कसला आग्रह नाही की अट्टहास नाही. आव नाही की महत्त्वाकांक्षा नाही. या कवितेला समाज बदलायचा नाही, तत्त्वचिंतन करायचे नाही, जीवनशोध घ्यायचा नाही की स्वत:ला खणून पाहायचे नाही. प्रे आणि प्रेमाला बिलगून असलेली जीवनाची अभिलाषा यांचा सुखदु:खमय अनुभव व्यक्त करण्याची धुंदी या कवीला आहे आणि त्या धुंदीत मनभरून नैसर्गिक गाणे एवढेच तिला करावेसे वाटते आहे. ‘खूणगाठी’ नावाच्या त्यांच्या संग्रहात एक सुरेख कविता आहे - ‘अजून माझ्या तळहातावर.’ त्या कवितेच्या शेवटच्या ओळी अशा आहेत- भवताली थरकते मुकेपण; ङ्गुलेंच गेली तरीहि ये पण : अजून माझ्या तळहातावर सुगंध उरले, सुगंध उरले ना.घं.च्या कवितेबाबतही आपला असाच अनुभव असतो आणि असेल.