Summary of the Book
अरविंद विश्वनाथ हे नाव आपल्याला अपरिचित नाही. सत्यकथा, अभिरुची, हंस इत्यादी नियतकालिकांतून त्यांच्या कथा, एकांकिका, कविता आपण वाचलेल्या आहेत. त्यांच्या पहिल्या वाचनात आपण विस्मित होऊन जातो आणि नंतर विचार करू लागतो. अरविंद विश्वनाथांच्या बहुतेक प्रत्येक कृतीतून एका अस्वस्थ अनुभवविश्वाचा आपल्याला प्रत्यय येत राहतो. त्या जगात आपला प्रवेश नकळत होतो आणि नंतर आपण आत कुठून शिरलो व बाहेर कसे जायचे हे कळत नाही. आता वापरत नसलेल्या अनेक बोळांच्या, पायऱ्यांच्या, अंधार दाटलेल्या ऐतिहासिक वास्तूत शिरावे आणि आपल्या सोबत असलेल्या माणसांपैकी कुणाचाही शब्द ऐकू येऊ नये, त्यांच्या शोधात निघावे तर समोर निव्वळ अंधारे बोळ व कुठेतरी उतरणाऱ्या-चढणाऱ्या पायऱ्या... भयंकर कोसळणारं एकाकीपण...