Summary of the Book
गुलजारजींच्या सिद्धहस्त लेखणीतून उमटलेल्या या दमदार कथा. अंबरीश मिश्र यांनी या कथांच्या तेवढ्याच समर्थपणे अनुवाद केला आहे.
एकूण आठ भागांत त्या समोर येतात. या कथांत काय नाही? जन्म- मृत्यूच्या मधले सारे आवर्तन येथे त्यातून फिरते. 'प्रत्येक कथा म्हणजे स्वानुभव नसतो. दुसऱ्याचा अनुभव, निरीक्षण, आत्मभान समजून घेतलं तर तो अनुभव आपला होतो,' असे ते
म्हणतात. कथासंबंधी ते लिहितात , 'संग्रहाला शीर्षक द्याव अशी एकही कथा नव्हती. देवडीवर बसून पिंजारी कापूस धुनकतो. मी कथा धुनकत राहिलो. मनात येईल त्याप्रमाणे उश्या, गाद्या भरून घ्या.'
अशा या पिंजलेल्या कथा आहेत. ते त्या घडवत नाहीत, घडत रहातात, हे विशेष. आयुष्यात आपल्याला अनेक माणसे भेटतात. काही कायम सोबत राहतात, काही एखाद्या वळणावर साथ सोडून जातात. अशीच काही माणसे आपल्याला पुस्तकांमधूनही भेटतात. अनेक कथा, कादंबर्या, कवितांमधून भेटलेली पात्रे मनात कायम रुंजी घालतात.अशीच काही नवीन पात्रे आपल्या भेटीस आली आहेत गुलजार यांच्या देवडी या नव्या कथासंग्रहामधून.