Summary of the Book
माणसाच्या जगण्याला केंद्रस्थानी ठेवून ललिता श्रीपाद सबनीस यांनी हे लेखन केले आहे. विशेषतः स्त्रिया, अनाथ मुळे, भटके. उपेक्षित, शेतकरी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. या विषयांवर त्यांनी चिंतनपर वैचारिक लेखन केले आहे. देशात स्त्रीच्या असलेल्या दुय्यम स्थानाला त्या प्रारंभीच्या लेखातच वाचा फोडतात. स्त्री - मुक्तीची नांदी, स्त्री स्वातंत्र्य, स्त्रीचे दुय्यम स्थान, विधवा आणि कुमारिकांचे मातृत्व असे विषयही त्यांनी हाताळले आहेत.
'शिक्षणाची दुरवस्था' या लेखात कायद्याने ज्ञान शिक्षकानेही बाळगायला हवे, असे त्या सांगतात, तर 'सत्याचा शोध' या लेखात 'विज्ञानाच्या प्रयोगशाळेत माणूस महत्वाचा ठरतो,' असे म्हणतात. कौटुंबिक हिंसाचार, अनाथ मुलांचा प्रश्न, घटस्फोट, म्हातारपण, अंधश्रद्धा, देवदासी, व्यसन, तमाशा कलावंत असा विषयांकडेही त्यांनी सजगपणे पाहिले आहे.