आज मी एक जेष्ठ नागरीक आहे. महाविद्द्यालयापासुन नारायण धारप, व.पु.काळे , बाबुराव अर्नाळकर हे माझे आवडते लेखक. श्री. राकेश यांच्या मतानुसार जर धारपांंच्या ग्रहण कांदबरीचा व झी वरील ग्रहण मालिकेचा काहीच एकमेकाशी संबध नसेल तर ही वाचक व प्रेक्षकांची फसवणुक आहे. कालच्या(15-6-18) एपिसोड मध्ये प्रिएंका ज्यांची मदत मागते, ते भुतबीत असे काही नसते असे सांगतात की जे धारपांच्या आजपर्यंतच्या कथानकाशी विसंगत आहे. यापुव्रीही महेश कोठारे यांनी धारपांच्या कथानकांवर सिरीएल्स काढल्या होत्या. परंतु गुढ, रसस्यमय, उत्कंठा निर्माण करणारे वातावरण निर्मिती करण्यास ते फारसे यशस्वी झाले नाहीत. नारायण धारपांच्या कथेमध्ये बदल करुन त्याचा जर विचका होत असेल तर धारपांंच्या वारसांनी झी टीव्ही वरील प्रक्षेपणास आक्षेप घ्यावा.