Summary of the Book
नैसर्गिक आपत्ती आली, की तिच्याशी सामना करण्याची पाश्चात्यांचीच नव्हे; तर जपानसारख्या पूर्वेकडील देशांची पद्धती वेगळी असते. भारतामध्ये मात्र, त्या उलट असते. जपानसारख्या देशात नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पारंपारिक मूल्यांना तडा जाऊ दिला जात नाही. या मुल्यांचा आणि माणसांचा आदर राखून आपत्तीशी सामना केला जातो.
देशाला संकटातून सावरले जाते. पण भारतात नेमके उलट घडते, असे लेखक रामचंद्र नलावडे, यांनी म्हटले आहे. अशा आपत्तीप्रसंगी भारतीयांना मानवी मुल्यांचा विसर पडतो. माणसं स्वार्थाचा विचार करतात. हाच विचार त्यांनी कादंबरीच्या रुपाने पोहोचवलाआहे. सामान्य माणसं, नोकरशाही आणि कावेबाज राजकारणी या तिन्ही स्तरावरील मानवी स्वभावाचे दर्शान त्यांनी घडविले आहे. माणूस व निसर्ग यांच्याशी संघर्षही त्यांनी रंगविला आहे.