Summary of the Book
या थोर व्यक्तींच्या कार्याचा आदर्श हेच आनंदाच्या निराळ्या वाटेच्या यशाचे गमक होय. " संकट कधी तरी सरते हिम्मत पुरुनी उरते ही उक्ती आपल्या जीवनात सार्थ करणारे थोर समाजसेवक आदरणीय श्री. अण्णा हजारे, तसेच मतपरिवर्तनातून सत्ता व मतपरिवर्तनातून माणसे बदलता येतात त्यासाठी हात नको मने जोडा " हा संदेश देऊन गेलेले आपणा सर्वांचे स्फूर्तीस्थान असलेले माजी पंतप्रधान कै. श्री. अटलबिहारी वाजपेयीजी व खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाची निराळी वाट शोधणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. सिधुताई सपकाळ या मंडळींनी आपल्या कार्यकर्तुत्त्वाची आनंदाची निराळी वाट शोधली. प्रतिकुल परिस्थितीत जनसामान्याची मने जिंकणाऱ्या या महान विभूतींना व त्यांच्या कार्यकर्तुत्त्वाला त्रिवार नमन...........