भारतात नर्मदा परिक्रमेला मोठे महत्व आहे. कार्दळीवन, पिठापूर, कुरवपूर आदींच्या परीक्रमाही केल्या जातात. पण २४ दत्तक्षेत्रे जोडून केल्या जाणाऱ्या परिक्रमेबद्दल अनेकांना माहिती नसते. क्षितीज पाटुकले यांनी स्वतः ही परिक्रमा करून त्याविषयीचे अनुभव, दत्तक्षेत्रांची महती 'श्री दत्त परिक्रमा' मधून दिली आहे. पुस्तकाच्या पहिल्या भागात दत्तात्रेय अवतार व कलियुगातील दत्त महात्म्य यावर विवेचन केले आहे. श्रीदत्तसंप्रदाय आणि परंपरा, दत्तात्रेयांचे प्रमुख शिष्य, २४ गुरु यांची थोडक्यात ओळख करून दिली आहे. श्रीदत्त परिक्रमा म्हणजे काय हेही स्पष्ट केले आहे. या परीक्रमाबाहेरील दत्तक्षेत्रांची माहिती यात आहे. दुसऱ्या भागात परिक्रमेतील तीर्थस्थानांचा परिचय होतो, त्याची सुरवात पुण्यातील शंकर महाराज मठापासून होते. औदुंबर, नृसिंहवाडी, अमरापूर, पैजारवाडी, कुडूत्री, बाळेकुंद्री, केंगरी, मुरगोड, कुरवपूर, मंथनगोड, कडगंची, लाडचिंचोळी, माणिकनगर, बसवकल्याण, गाणगापूर, अक्कलकोट, लातूर, माहूर, कारंजा, भालोद, नारेश्वर, तिलकवाडा आणि गरुडेश्वर आदी २४ स्थानांची महती यात सांगितली आहे. प्रत्येक क्षेत्राच्या ठिकाणचा संपर्क पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल आदी नमूद केले आहे.
‘श्रीदत्त परिक्रमा’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5168208455579541907