Summary of the Book
हा मनोज सुरेंद्र पाठक यांचा दुसरा कविता
संग्रह आहे.यापूर्वी अभिधानंतर प्रकाशनाने
त्यांचा ' अधिसत्ता ' हा संग्रह सन 2006 मध्ये प्रकाशित केला होता.चौदा वर्षांचा कालावधी ओलांडून एकदा पुन्हा ही कविता
सामोरी येते आहे, ती गेलेल्या काळाच्या खुणा दाखवतच.
कवी हा नव्वदोत्तरी कालखंडातील असला तरी त्या कालानुरूपच अभिव्यक्तीला हा कवी बांधील आहे असे दिसत नाही. पुस्तकाच्या मलपृष्ठावरील माहितीत सतीश तांबे यांनी लिहिलेच आहे की ―
कवीच्या बाबतीत विचार करता त्याच्या आननापेक्षा महत्त्वाचं असतं ते त्याचं मन आणि एखाद्या कवीचा संग्रह जेव्हा समोर येतो, तेव्हा त्याच्या मनाचं आननच त्यातून दृग्गोचर होतं.
' दंडविधान ' वाचताना ह्या कवीचं वेगळेपण जाणवतं ते असं की,ह्या उन्मनी अवस्थेतील कविता आहेत.उन्मनी अवस्था म्हणजे कळली ना? दत्ताच्या आरतीतील ' हरपले मन झाले उन्मन,मीतूपणाची झाली बोळवण ' असं वर्णन आहे ना,ते उन्मन!त्यामुळेच ' दंडविधान ' मधील कविता ही अपवादात्मक सच्ची वाटते.
एरवी,बहुतांश कवी हे आपल्या अंतरंगातील गल्ल्या,बोळं,अंधारे कोनेकोपरे,अडगळीच्या खोल्या,वळचणी,भूतबंगले,बागबगिचे,ह्यांचे दर्शन घडवत असतात.
― एक काम करा, ' दंडविधान ' वाचा आणि त्यातून तुम्हांला जे कवीचं मन उमजेल ना,तेच खुशाल' उन्मन ' आहे असं समजा.