Summary of the Book
पोलिस समाजाचे रक्षणकर्ते असतात, हे खरेच; परंतु त्यांचे कार्य समाजापर्यंत पोहोचतेच असे नाही. उलट पोलिसांचे जीवन, त्यांच्यासमोरील आव्हाने, त्यांचे प्रश्न यांविषयी समाज अनभिज्ञच असतो.
कादंबरीकार अरुण हरकारे यांनी या पुस्तकातून पोलिसांच्या विशेषतः मुंबई पोलिसांची शान असणाऱ्या पोलिसांच्या कामाची, साहसाची ओळख करून दिली आहे.
मुंबईच्या पोलिस आयुक्तपदाची कारकीर्द गाजवणारे राकेश मारिया, अँटीकरप्शनचे काम धडाडीने करणारे विश्वास नांगरे-पाटील, शौर्यपदक विजेते प्रफुल्ल भोसले यांच्या कामाची पुस्तकातून जवळून ओळख होते.
साडे सहा कोटींचे हिरे प्रकरण, अँसिड हल्ला प्रकरण, बनावट चलनी नोटा आदी प्रकरणे तडीस नेणाऱ्या कर्तुत्ववान पोलिस अधिकाऱ्यांची माहिती होते. कसाब जिवंत कसा राहिला याची थरारक कथा समजते.