डॉ सयाजीराव गायकवाड
13/08/2021
समकालीन जागतिक पेचाला तळा मुळापासून भिडणारा सिद्ध हस्त लेखक त्याची लेखणी ऑक्सीजण विरहित सजिवाच्या तडफडी इतकीच तळमळते. आतले बाहेरचे दुःख जाणीवेने मांडते. वाचलेच पाहिजे असे अस्सल पुस्तक... क्वारंटाईन..
कोरोना... माणूस.. असुरक्षित.. अंतर... एकटं... श्वास... हॉस्पिटल... कुटुंब.. मुले... आई वडील कुठल्या कुठे सगळं...तरीही बाहेर पडू हा आशावाद
आप्पासो बुडके
08 May 2021 05 30 AM
कोरोनाच्या महामारीमुळे गावाकडून शहराकडे पोट भरण्यासाठी गेलेल्या चाकरमानी वर्गाची लॉकडाऊनमुळे घुसमट झाली. नोकरी गेली, जगणं अवघड झालंं, रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला, दळणवळणाची साधने देखील बंद झाली, काही तरी जुगाड करून गावाकडे हे लोक आले परंतु तिथेही क्वारंटाईन व्हावे लागले. या सगळ्या विपरित परिस्थितीला सामोरे जाताना या चाकरमानी वर्गाची झालेल्या शारीरिक आणि मानसिक घुसमटीबरोबरच समाजातील माणसामाणसांत निर्माण झालेला दूरावा या कादंबरीतून नेमकेपणाने टिपला आहे.
नितीन गणपत शिंदे
08 May 2021 05 30 AM
खूप छान कादंबरी. सहज,सुंदर व प्रवाही भाषा. गुंतवून ठेवणारे कथानक.
ग्रामीण बोली भाषेचा प्रभावी वापर. सर्वांनी वाचावी अशी सुंदर कादंबरी.