Summary of the Book
आपलं व्यक्तिमत्वं घडवणारं, मनाच्या कोपऱ्यात कायम राहणारं आणि हळव्या भावविश्वाचा भाग असणारं घर प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे ऋतुरंगने 'माझं जन्मघर' हा विषय निवडला आहे.
गुलजार, सुशीलकुमार शिंदे, आरती अंकलीकर-टीकेकर, दिनकर रायकर आणि किशोर कदम यांनी आपल्या जन्मघराच्या आठवणी जागवल्या आहेत, तर यशवंतराव गडाख, राजन खान, अनंत दीक्षित, हेमन्त टकले यांनी आपल्या गावाकडच्या घराच्या आठवणी जागवल्या आहेत. वसंत आबाजी डहाके, अरुण जाखडे, किशोर मेढे, रवींद शोभणे आणि अरुण शेवते यांनी घराघरांचे आगळे रुप मांडले आहे. तुकोबांच्या घरी, गायकवाडांचा वाडा, शेक्सपियर हाऊस या गाजलेल्या घरांवरील लेख वाचनीय आहेत.