Summary of the Book
आयटी ह्या शब्दप्रयोगाचा अर्थ आहे इंडियाज् टॅलेंट. फक्त पाच वर्षापूर्वीपर्यंत ह्या क्षेत्रात कुठली तरी पदवी म्हणजे यशाचा महामार्ग असे सर्वाचे मत होते .ऑटोमेशनमुळे आयटी क्षेत्रातल्या हजारो नोकऱ्या ,येत्या पाच ते दहा वर्षात संपुष्टात येऊ शकतात .मोबाईल अॅप हे क्षेत्रही स्पर्धात्मक होत आहे .पण त्याचबरोबर सायबर सुरक्षा ,क्लाउड काँप्यूटिंग ,आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI),बिग डेटा ह्यांसारख्या क्षेत्रांमध्ये अनेक नवीन नोकऱ्या कींवा कामे उपलब्ध होतील .त्यामुळे आयटीमधील करिअर एकदम टाकाऊ तर बिलकूल नाही .सर्वच उद्योगांना कमी -अधिक प्रमाणात संगणकाचा वापर करावा लागणार असल्याने तांत्रिक व्यावसायिक हे कायमच गरजेचे ठरणार आहेत .फक्त त्यांच्या स्कील प्रोफाईल ,कार्यानुभव व व्यवसाय प्रक्रियेत घडणारे बदल हे महत्त्वाचे घटक आहेत ,जे इतिहासात घडले ते भविष्यात नक्की घडणार नाही .ज्या तंत्रज्ञानामुळे काही काळ बेरोजगारी वाढते तेच तंत्रज्ञान राबवण्यासाठी कालांतराने रोजगार उत्पन्न होतात हे त्रिकालाबाधित सत्य आपण स्वीकारले पाहिजे .बदलत्या जमान्याची पावले ओळखून त्यानुसार स्वतःला बदलत राहणाऱ्या ,नवनवीन कौशल्ये शिकत राहणाऱ्या आणि अर्थातच थोडा वेगळा ऊर्फ 'हटके 'विचार करणाऱ्या ,व्यावसायिकाला कायम ' अच्छे दिन 'येणार .गरज आहे ती मानसिकता बदलायची आहे .हे पुस्तक लिहायचा खरे तर हाच हेतू आहे .