Summary of the Book
मानवी संस्कृतीशी जोडल्या गेलेल्या महत्त्वाच्या घटकांवर भाष्य करणारे "कहाणी संस्कृतीची' हे पुस्तक आहे.
उरुळी कांचन येथील निसर्गोपचार केंद्रात दोन महिने असताना तेथे आलेल्या अनुभवांवरून डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांना या लेखनाची दिशा सापडली. त्यातूनच या पुस्तकाची निर्मिती झाली. या पुस्तकातील लेखांमधून मानवी जीवन आणि मानवी संस्कृती ही धर्म आणि जात यांच्या पलीकडे जाऊनच विकसित होत असते, हा मुद्दा वाचकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न लेखकाने केला आहे.
संस्कृतीचा सगळ्यात महत्त्वाचा आणि छोटा घटक म्हणजे माणूस असतो. या माणसात संस्कृतीची मूल्ये रुजावीत, त्याच्यातली माणुसकी वाढीस लागावी, म्हणून हे लेखन केल्याचे रणसुभे आपल्या मनोगतात म्हणतात. निसर्ग आणि माणूस, मूलभूत गरजा, धर्म आणि संस्कृती, समाज, नाती अशा विविध विषयांवर या पुस्तकात त्यांनी लेखन केले आहे.