Summary of the Book
.... कुणीतरी हाताला धरून बाहीर काढलं. संतापानं त्यो लाल झाला व्हता. तव्यावानी त्याच अंग पोळत व्हतं. थराथरा त्याचे पाय कपात व्हती, याड लागल्यावानी हातवारे त्यो करीत होता. कपड्यांचं भान राह्यल नव्हतं. सदरा फाडून टाकला व्हता. गळ्यातल उपरण डोक्याला फडकं बांधावं तस्स बांधल व्हतं. पटका गळ्यात माळ घालाव्यात तशा रीतीनं गुंडाळला व्हता अन झापझाप पावल टाकीत धामणगावचा रस्ता तुडवीत व्हता.
दिवस कलत आल्ता. फाट्यावर देशी दारूच दुकान व्हतं. दोन बाटल्या त्यानं रिचवल्या. डोळ्यापुढ अंधारी येत व्हती. एवढं पिऊनही तोंडाला कोरडच व्हती. तसाच ढेकळातून आडवाट करून करून रानात आला.
झाकड येळ झाल्ती. नादात तस्साच आंब्याच्या झाडावर चढला. गळ्यातला पटका फांदीला लावला अन खुशाल लोंबकळला. दोन-तीन आचके दिले अन विश्वनाथचा देह निपचित झाला. कुणाला कायीच बोलला नाही. खिशातली चिठ्ठी पंचनाम्याच्या येळी पोलिसांनी काढली अन दुसऱ्या दिशी पेपरात बातमी झळकली.
"मावेज्याचा आणखी एक बळी. "