हिंदी चित्रपटात पार्श्वागायनाला १९३५ मध्ये सुरुवात झाली . ज्यांना गाणे म्हणता येत असे ते त्या वेळी चित्रपटाचे नायक - नायिका असत . त्या वेळी के . एल. सैगल हे नायक व गायक म्हणून लोकप्रिय झाले . नुरजहाँ , सुरय्या यांनीही दोन्ही आघाड्या सांभाळल्या . पुढे किशोर कुमार यात यशस्वी ठरले . त्याकाळातील गायकांचा परिचय अशोक उजळंबकर यांनी 'वो जब याद आये' म्हणून करून दिला आहे . पार्श्वगायनाची कथा , पार्श्वगायकाची परंपरा आधी सांगून प्रथम परिचय अर्थात कुंदनलाल सैगल यांचा येतो . पुढे पंकज मलिक , जी. एम. दुराणी , सुरेंद्र , नूरजहाँ , शमशाद बेगम , सुरय्या , जगजीत कौर , तलत महमूद , महंमद रफी , मुकेश , लता मंगेशकर , आशा भोसले , गीता दत्त , मन्ना डे , सुमन कल्याणपूरकर , किशोर कुमार आदी २६ गायक - गायिकांची ओळख व सोबत त्यांच्या गाजलेल्या गाण्यांची यादी दिली आहे. तसेच के.सी. डे , खुर्शीद , काननदेवी , अमीरादेवी कर्नाटकी , जोहरबाई अंबालेवली , शांता आपटे आदींचा परिचयही यात करून दिला आहे .
‘वो जब याद आये’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5233660243236376863