Summary of the Book
धडाडी आणि मेहनतीच्या जोरावर अतुलनीय यश मिळवलेल्या २० उद्योजकांच्या व्यक्ती चित्रांचा हा संग्रह आहे. प्रभाकर गनबोटे, जयकुमार पाठारे, प्रवीण हेर्लेकर, सुनील जोशी, अनिल मांदूसकर, शैलेश पाटील, धनंजय बेडेकर, सुनील पांचाळ,डॉ. जयंत अभ्यंकर, दिलीप दलाल,
प्रशांत काशीकर आदींनी आपापल्या व्यवसायात यश मिळवण्यासाठी केलेला संघर्ष पुस्तकात वाचायला मिळतो.
यातले बहुतेक जणग्रामीण पार्श्वभूमी असलेले किंवा सामान्य परीस्थितीतून वर आलेले आहेत.काहींची पार्श्वभूमी व्यवसायाची आहे.
मात्र, त्यांनी तो व्यवसाय जोमाने वाढविला आहे.काहींनी स्वत:च परिश्रमपूर्वक व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली आहे. या साऱ्यांच्याच कथा उद्बोधक, अनुकरणीय आहेत.
स्वप्नांना समृद्धीची ओढ असते. पण ती स्वप्ने पूर्ण होण्यासाठी अथक प्रयत्न, सकारात्मक दृष्टी, नियोजन या गोष्टी आवश्यक असतात. यशस्वी उद्योजकांकडे हे सर्व गुण असतातच असे नाही. काहीजण ते गुण प्रयत्नपूर्वक अंगी बाणवतात. प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर ते सर्व अडचणींवर मात करतात. सौ. श्वेता गानू यांनी अशाच २० यशस्वी उद्योजकांच्या चरित्रगाथा " स्वप्नांना ओढ समृद्धीची " ह्या पुस्तकात लिहिल्या आहेत. उद्योजक घडतो कसं ? हे उलगडून दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सकाळ वृत्तसमुहाचे श्री. प्रतापराव पवार यांनी या पुस्तकाला प्रस्तावना दिली आहे तर गोव्याचे मुख्यमंत्री श्री. मनोहर परींकर यांनी या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे.
श्वेता गानू यांनी वीस उद्योजकांच्या मुलाखती घेऊन लिहिलेलं हे पुस्तक नवउद्योजकांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल. बांधकाम व्यवसाय, औषधनिर्मिती आणि विविध उत्पादनांचे वितरण करणाऱ्या कंपन्या अशा विविध क्षेत्रांत कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या राज्याच्या विविध भागांतील उद्योजकांना त्यांनी बोलतं केलं आहे. अडचणी आणि संकटं आली तरी या उद्योजकांनी डगमगून न जाता कसा मार्ग काढला, ते सारं वाचनीय आहे. कष्ट करून यशाचा मोठा टप्पा गाठलेल्या या उद्योजकांच्या या कहाण्या राज्याच्या गेल्या काही वर्षातील प्रगतीच्या नोंदीच आहेत. सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांची या पुस्तकाला प्रस्तावना आहे.