Summary of the Book
ही आहे अक्षरांची आनंदयात्रा. या आनंदयात्रेचे वारकरी आहेत लेखक, राजकीय नेते, तत्त्वज्ञ, विचारवंत, संपादक, कायदेतज्ज्ञ, ग्रंथपाल आणि वैज्ञानिकही. या सर्वांमधले समान सूत्र म्हणजे छापील अक्षरांबद्दल आयुष्यभर वाटत आलेलं अपार प्रेम. या प्रेमाचा प्रवास या सार्या नामवंतांनी उलगडलाय आणि त्यात सहभागी करून घेतले आहे त्यांच्यासारख्याच वाचनावर प्रेम करणार्या असंख्य वाचकांना.
ग्रंथांच्या सहवासात घेऊन जाताना हे धुरंधर वाचक आपली भेट घडवतात ती शेक्सपीअरपासून कालिदासपर्यंत, बुद्धापासून मार्क्सपर्यंत, टिळकांपासून आंबेडकरांपर्यंत आणि अशा असंख्य ज्ञातअज्ञात लेखकांची. या पानामध्ये भरले आहे एक अद्वितीय साहित्यसंमलेन! कधीही न संपणार! आनंदाची अखंड पखरण करत राहणारे!