Summary of the Book
लिखाण म्हणजे पत्रकार मंडळींसाठी डाव्या हातचा खेळ. पण व्यवसायाचा भाग म्हणून दररोज लिहिणे वेगळे आणि स्वतःच्या आनंदासाठी काही लिहिणे वेगळे. पत्रकार आणि प्रकाशक रमेश उदारे यांच्या ओघवत्या लिखाणातून साकारलेले ' आठवणींची पाऊलवाट ' हे नवेकोरे पुस्तक वाचकांच्या भेटीला आले आहे. ' हे पुस्तक म्हणजे चरित्र किंवा आत्मचरित्र नाही , तर फक्त आठवणी आहेत. त्या लिहिण्याचा मोह झाला हे मात्र प्रामाणिकपणे कबूल करतो ', अशी कबुली लेखक सुरुवातीलाच देतात. एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात येतात तसे चढ-उतार त्यांच्याही आयुष्यात आले. यातलेच काही त्यांनी शब्दबध्द केलेत.