Summary of the Book
माणूस आणि शेती, जमीन पाणी यांच्याशी संबंधित देशात अनेक वोषाय् आहेत. त्यांतील काहींचा अभ्यास करून त्याची सांगोपांग चर्चा मिलिंद बोकील यांनी 'जनाचे अनुभव पुसतां' मध्ये केली आहे. लातूरच्या भूकंपानंतर ज्या महिलांना वैधव्य आले, त्यांची हकीगत, मराठवाड्यातील दलित व गावकीतील जमिनीचा वाद, डहाणूतील चिक्कूलागवडीमुळे झालेली आर्थिक क्रांती व उपसा जलसिंचनाविषयी मार्गदर्शन यात आहे. विकासाच्या प्रक्रियेशी संबंधित हे लेख अभ्यासपूर्ण आहेत.