Summary of the Book
अभय बंग व राणी बंग ह्यांच्या SEARCH संस्थेने हाती घेतलेल्या “अंकुर” ह्या प्रकल्पातील प्रत्यक्ष अनुभवांवर हे पुस्तक लिहिले आहेत.
महाराष्ट्रात बालमृत्यूंची समस्या भीषण आहे. दर वर्षी गावोगावी , आदिवासी पाड्यात व शहरी झोपडपट्ट्यात अंदाजे १,५०,००० मुले मरतात. अभय बंग यांनी ह्या प्रश्नाचा पाठ पुरावा केला. अंकुर प्रकल्पाद्वारे जवळपास १०० गावात या प्रश्नावर उत्तर शोधण्याचे प्रयत्न गेली १५ वर्षे केले. गावातील आई आणि बाळाची काळजी त्याच्या घरात घेण्यासाठी व लहान मुलांच्या आजारांचा उपचार करण्यासाठी गावातील बायकांनाच सक्षम बनविणे हा तो उपाय. ह्या उपायानंतर बाल मृत्यूचे प्रमाण कमालीचे घसरले. आपल्या देशात अर्भक मृत्यूदर ६४ आहे. देशात बहुतेक गावामध्ये भरवशाची आरोग्य सेवा नाही. भारत सरकारने ५ राज्यामध्ये सर्चच्या प्रणालीचा उपयोग करायचे ठरविले आहे.
अभय बंग ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतात -
"मुले का मरतात? त्यांना कसे वाचवता येईल?
गडचिरोली जिल्ह्यातील ३९ गावात व नंतर ‘अंकुर’ प्रकल्पाद्वारे महारष्ट्रातील जवळपास १०० गावात या प्रशनावर प्रभावी उत्तर शोधण्याचे प्रयोग आम्ही गेल्या १५ वर्षात केलेत. उत्तर सापडले.
गावातील आई व बाळाची काळजी त्यांच्या घरातच घेण्यासाठी व लहान मुलांच्या आजाराच उपचार करण्यासाठी गावातील बायांनाच सक्षम बनवणे हा तो उपाय."