Summary of the Book
संतांचे साहित्य संकुचित अर्थाने केवळ धार्मिक म्हणून पहिले जाते, पण ते अधिक व्यापक अर्थी जीवनविषयक चिंतन आहे . ते केवळ प्रस्थापित संस्कृति आणि व्यवस्था यांचे समर्थन करत नाही , तर त्याचा निषेध करते , त्या विरोधी आत्मिक बळही देते आणि विद्रोहाची भूमिका घेते हेही मान्य होत चालले आहे .
या पार्श्वभूमीवर स्त्री संतांच्या रचनांचे विश्लेषण करणे गे प्रा.डॉ. तारा भवाळकरांनी या पुस्तकाद्वारे केले आहे . एकीकडे अगदी कश्मिरपासून ते दक्षिणेकडील केरळ-तामिळनाडू पर्यंत आणि पूर्वेकडील बंगालपासून पश्चिमेच्या गुजराथ - राजस्थान पर्यंतच्या सर्व स्त्री - संतांच्या वाचनाचा पट त्यांनी यामध्ये खुला केला आहे . हा आढावा घेताना मध्ययुगीन स्त्री जीवनाचा धांडोळा , तसेच स्त्री संतांनी केलेली वैचारिक बंडखोरी त्यांनी समोर ठेवली आहे . स्त्रीवादी दृष्टीकोनातून केलेल्या या विश्लेषणातून प्रा.डॉ. तारा भवाळकरांचे हे पुस्तक एक नावे दर्शन घडवते .
स्त्री दृष्टीकोनातून त्यांनी केलेलि परखड मांडणी , संतांच्या मनातील द्वंद्व आणि राजकीय परिस्थितीशी घातलेली सांगड आपल्याला आजच्या समाजातील द्वंद्वाला आणुन भिडवते व विचार करण्यास भाग पाडते . आणि म्हणून समकालीन वैचारिक संघर्षाला या पुस्तक रूपाने एक पार्श्वभूमी मिळवून देणारे त्यांचे हे योगदान महत्वाचे ठरते .
यासाठी अकादमिक क्षेत्रात सर्वांनी वाचावे असे हे पुस्तक...