Summary of the Book
खानदेशला ऐतिहासिक, सांस्कृतिक व वाङ्मयीन परंपरा आहे. रामायण, महाभारतापासून हा वारसा चालत आला आहे. अनेक साहित्यिक, कवींनी हा प्रदेश समृद्ध केला आहे. येथील कविता, कवी यांची महती ‘खानदेशचे काव्यविश्व’मध्ये सांगितली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात खानदेश हा ‘मराठी कवितेचे तीर्थक्षेत्र’ म्हणून ओळखला जात असे.
आजही ही ओळख जपली आहे तेथील साहित्यिकांनी. स्वातंत्र्यपूर्व, स्वातंत्र्योत्तर आणि नव्वदोत्तरी अशा तीन कालखंडांतील कवींचा परिचय व त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य यात आहे. कवितेच्या अभ्यासकांसाठी हा ग्रंथ उपयुक्त आहे. याचे संपादक अशोक कोतवाल आहेत. सहसंपादक शशिकांत हिंगोणेकर आहेत.