Summary of the Book
मराठी वाड्मयात 'कादंबरी' हा अत्यंत लोकप्रिय लेखन प्रकार आहे. मराठीत पहिली कादंबरी १८४१ मध्ये हरी केशवजी यांची
'यात्रिकक्रमण' प्रसिद्ध झाली. त्यानंतर 'हातिमताई' हे भाषांतर , १८५७ मध्ये बाबा पदमनजी यांनी 'यमुना पर्यटन' लिहिली.
कादंबरीचा हा प्रवास ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक, राजकीय अशी वळणे घेत स्थिरावला आहे.
कृष्णशास्त्री चिपळूणकर,मोरोबा कान्होबा, म. मो. कुंटे, अप्पासाहेब किर्लोस्कर, ह. ना. आपटे, ज. धो. भांगले, गो. बा. देवल,
ना. सी. फडके, न. चि. केळकर, नाथमाधव, ग. त्र्यं. माडखोलकर, वि. स. खांडेकर, श्री. ना. पेंडसे, यांच्या कादंबऱ्यांना वाचकांचे
प्रेम मिळाले. या व अन्य कादंबरीकारांच्या साहित्याची समीक्षा, विवेचन नरहर कुरुंदकर, यांनी 'धार आणि काठ' मध्ये केले आहे.
अनेक जुन्या कादंबऱ्यांचे रसग्रहण, लेखकाची त्यामागची भूमिका, त्या वेळच्या काळातील तिचे महत्व, मराठी कादंबरीची प्रवृत्ती,
प्रवाह, टप्पे यांचा आढावा यात घेतला आहे.