Summary of the Book
श्रीमान श्रीकांत मोरे यांच्या मते या परिपूर्ण जीवनाला चिरंतन मूल्यांची जोड असणे तितकेचे आवश्यक आहे. सदाचार, सदविचार, पावित्र्य, चारित्र्य, सेवा, समर्पण, भूतदया, औदार्य, प्रेम, करुणा आणि दया यातच मानवता सामावलेली आहे. यामध्येच जीवनाची परिपूर्णता सामावलेली आहे. या मूल्यांच्या आचरणांतूनच माणसातले 'पशुत्व' लोप पावते नि आणि त्यातले 'देवत्व' फुलून येते. चराचर सेवा माणसाचे स्वतःवरचे प्रेम कमी करते. समर्पण माणसाचा स्वार्थ संपविते, दया माणसाला व्यापक बनविते. सदाचार माणसाला शुद्धता देतो, चारित्र्य माणसाला आत्मबळ देते आणि प्रेम माणसाच्या जगण्याला सुगंधित करते. म्हणून मी असे म्हणेन की, मूल्यांविना जीवन म्हणजे मुर्तिविना मंदिर, जळविना सरोवर, गांधाविना पुष्प आणि आत्म्याविना शरीर होय. चिरंतन मूल्येच व्यक्तीला श्रीमंत आणि समृद्ध सशक्त आणि उबदार करतात या मूल्यांतून मानवी जीवनात खोलवर संस्कार रुजविता येतात. भूक, भोग आणि भागाकार यांच्या मगरमिठीत सापडलेल्या आजच्या समाजाला या मूल्यनिष्ठ आचरणाची फार मोठी गरज आहे याची तीव्र जाणीव लेखकाला झालेली असल्याने जवळजवळ प्रत्येक ललितलेखात याचा त्यांनी आग्रह धरलेला आहे.