Summary of the Book
उत्कृष्ट अनुवादासाठीचा ’साहित्य अकादमी’चा पुरस्कार लाभलेल्या या काव्यसंग्रहाचा गोवा विद्यापीठामधल्या एका पदव्युत्तर अभ्यासक्रमातही समावेश करण्यात आला आहे. महाभारतातली ही कथा.
’गालव’ हा ’विश्वामित्र’ ऋषींचा शिष्य. त्याच्या आग्रहाखातर विश्वामित्र त्याच्याकडे ८०० श्यामकर्णी घोड्यांची दक्षिणा मागतात. ती देण्याची ऐपत नसलेला गालव राजा ’ययाती’कडे जातो. ययातीकडेही तेवढं द्रव्य नसतं, परंतु याचकाला विन्मुख पाठवायचं नाही म्हणून तो आपली रुपमती मुलगी ’माधवी’ विनियोगासाठी गालवाला देतो. तिला ३ राजांकडे प्रत्येकी १ वर्ष गालव उपभोगासाठी ठेवतो. वर्षानंतर प्रत्येकाकडून २०० श्यामकर्णी घोडे घेऊन ६०० घोड्यांची दक्षिणा विश्वामित्राला देतो. विश्वामित्र स्वतःकडे माधवीला वर्षभर ठेवतात आणि उरलेल्या २०० घोड्यांची दक्षिणा माफ करून टाकतात. त्यानंतर ययाती तिचं स्वयंवर मांडतो, परंतु ती सगळ्यांना अव्हेरून तपोवनात निघून जाते.
अशी ही आदर्श गुरू, त्याचा आज्ञापालनकर्ता थोर शिष्य आणि नरोत्तम राजा ययाती यांची गोष्ट...
यात ’माधवी’चं स्थान काय? तिच्या इच्छा काय? तिला कसं समजावून घ्यायचं? तिच्यापर्यंत कसं पोचायचं?
’बोल माधवी' हा काव्यसंग्रह नव्हे, तर ते 'स्त्रीच्या वेदनेचं महाभारत' आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये