Summary of the Book
श्रीराम बापट यांच्या कथांच्या माध्यमातून मानवी जीवन मानसशास्त्रीय पद्धतीने समोर आले आहे. पोंगडवस्थेतील तरुणांची मनोवस्था ते श्रद्धा - अंधश्रद्धापर्यंत विविध विषय त्यांनी हाताळले आहेत. हे विषय जसे सामाजिक प्रश्न म्हणून समोर येतात, तसेच मानवी गुंतागूंत म्हणून ! एकूण २१ कथांचा हा संग्रह आहे. कथांमध्ये समाजातील विकृती जशा दिसतात, तसेच गुन्हेगारी जगही दिसते.
'ते दहा' या कथेत दहशतवाद्यांची निर्घुण कृत्ये दिसतात, 'अगतिकता' आणि परंपरेला दृढ चालवावे'या दोन कथांमध्ये वृद्धांच्या आजारपण आणि कुटुंबीय 'मी हरले मी जिंकले' या कथेतून एका तरुणीचे भावविश्व उलघडते. ' राग बुवांचा' ही मुलाखतवजा कथा रंग भरते. पोंगडावास्थेतील मुलांची समस्या 'विकृत' या कथेतील हाताळली आहे. 'डिप्रेशन' आणि नायगरा जल' या कथा विनोदी आहेत.