Summary of the Book
बलुती संपली आणि नगर-बीड जिल्ह्यांतील मोठा दलित समाज ऊसतोडीच्या कामाला लागला. दैन्य कायम राहिले, परंतु त्या जोडीला अस्थिरता आली. ‘पाचट’मध्ये येते ती अशाच एका कुटुंबाची कथा. १९७२ च्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीमुळे ती गहिरी
बनते.
ऊस तोडकरी साखर कारखान्याच्या आश्रयाने राहतात. कामाचे हंगामी स्वरूप आणि असंघटित वर्ग यांमुळे त्यांच्या व्यथावेदनांकडे समाजाचे लक्ष वेधले जात नाही. हे पुस्तक ही या लक्षावधी कामगारांची कैफियतही होते...