Summary of the Book
‘स्त्री’ ही कुलीन, शालीन, सुसंस्कारित, क्षमाशील, चारित्र्यवान, सहनशील असावी अशी अपेक्षा भारतीय संस्कृतीत केली जाते. पौराणिक काळातील अगदी राजघराण्यातील स्त्रियांनाही ही सर्व सामाजिक विशेषणे लेऊनच आयुष्य जगावे लागत असे. वडील, भाऊ, पती यांच्यासाठी अनेक त्याग करीत त्यांची प्रतिमा समाजात उंचावण्यासाठी स्त्रिया स्त्रीत्वही पणाला लावत. महाभारत व पुराणातील अशा १४ स्त्रियांचे अंतरंग माधवी कुंटे यांनी ‘स्त्रीपर्व’मधून उलगडले आहे.
यातील बहुतेक स्त्रिया राजघराण्यातील व सौंदर्यवती आहेत. त्या वेळच्या पुरुषप्रधान संस्कृतीत संकटे झेलत, अत्याचार सहन केला, मात्र बुद्धी, कर्तृत्व याच्या जोरावर त्यांनी स्वतःचे अस्तित्व टिकविले. त्यांच्या कथांमधून आजच्या स्त्रीलाही उमेद मिळू शकेल.